मुंबई, 18 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले.

या चौकशी दरम्यान पोलिसांनी आदित्य चोप्रांकडे ‘पानी’ चित्रपट आणि सुशांतमध्ये झालेल्या यशराज फिल्म करारासंबंधित विचारणा केली. सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद तुफान रंगत आहे. १४ जुलै रोजी त्याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर सगळं बॉलिवूड हळहळलं. मात्र या प्रकरणात दोन आरोप होऊ लागले. काही कलाकारांनी मात्र सुशांत सिंह हा घराणेशाही, गटबाजीचा बळी आहे असा आरोप झाला. कंगना रणौतने या प्रकरणी सर्वात आधी आरोप केला आहे. मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला अशी भूमिका कंगनाने घेतली आहे. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृहखात्यानेही लक्ष घातलं. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात ३० पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

 

News English Summary: Mumbai Police has now recorded Yashraj’s reply to Aditya Chopra in connection with the suicide of actor Sushant Singh Rajput. Mumbai Police has asked Aditya Chopra some questions in this regard. Mumbai Police has tweeted the information in this regard.

News English Title: The Statement Of Aditya Chopra Of Yash Raj Films Recorded In Sushant Singh Rajput Death Case News Latest updates.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला