8 May 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

आज २०वा कारगिल विजय दिवस; देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन

Kargil Day, Indian Army, Pakistan Army

मुंबई : कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्याचंच स्मरण म्हणून आज देशभरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली वाहिली जाते.

राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल-द्रासमध्ये कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील. तर विजय दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील. दरम्यान, १९९९ सालचे कारगिल युद्ध जवळपास ६० दिवस सुरू होते . ८ मे ते २६ जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते, तर १३६३ जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

पण हे सर्व इस्रायल या देशाच्या मदतीमुळेच शक्य झाले होते. पाकिस्ताननं भारताला अंधारात ठेवून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. घुसखोरीच्या ब-याच काळानंतर भारताला याची भणक लागली. जवळपास भारताच्या सर्वच चौक्यावर त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्यानं ताबा मिळवला होता. पण एवढ्या उंचावर युद्ध करून त्या चौक्या परत मिळवणे हे भारतीय लष्करासाठी थोडं जिकिरीचं काम होतं. तसेच कुरापतखोर पाकिस्ताननं कोणकोणत्या चौक्यांवर ताबा मिळवलाय आणि किती प्रमाणात पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी केली आहे हे जाणून घेण्यासाठी भारताकडे त्यावेळी अत्याधुनिक अशी प्रणाली नव्हती.

अशातच कारगिल युद्धाच्या वेळी मित्रधर्माला जागून इस्रायल हा देश भारताच्या मदतीला धावून आला होता. त्यावेळी इस्रायलनं भारताला युद्धासाठी मोर्टार, दारूगोळा आणि लढाऊ विमानांसाठी आवश्यक असणा-या लेझर गाइडेड मिसाइल पुरवल्या होत्या. ड्रोनसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्रायलनं त्यावेळी हेरॉन आणि सर्चर हे दोन प्रकारचे ड्रोन भारताला पुरवले होते. या ड्रोनमुळेच भारतीय लष्कराला कारगिलमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा फोटो सापडून त्यांचा ठावठिकाणा लागला होता.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x