23 April 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या
x

कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले

BJP, MahaVikas Aghadi, Operation Lotus, Minister Shashikala Jolley, Maharashtra

बंगळुरू, ९ ऑगस्ट : आजच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गेहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.

तत्पूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडून भाजपाने सत्ता स्थापन केली, त्यानंतर राजस्थानमध्ये सध्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस सरकारवर टांगती तलवार आहे. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच राज्यात कोरोना संकट संपल्यानंतर भाजपचे सरकार अस्तित्वात येईल असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सध्या कोरोनाचं संकट आहे, हे संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपाचं सरकार निश्चित येईल. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचेच सरकार पाहिजे असं त्यांनी सांगितले. शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री जोल्ले यांनी राज्यातील सरकारबाबत केलेल्या विधानामुळे राज्यात भाजपाचं ऑपरेशन लोटस पडद्यामागे सुरु असल्याचं दिसून येते. हे सरकार पाडण्याची भाजपाला गरज नाही, आमची लढाई कोरोनासोबत आहे, या परिस्थितीत सरकारचं अस्तित्व दिसत नाही, त्यामुळे सरकार पाडण्याचं आव्हान देण्याआधी सरकार चालवून दाखवावं असं प्रतिआव्हान देत सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नाही, त्यामुळे एकमेकांच्या भांडणातूनच हे सरकार स्वत:हून कोसळेल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.

 

News English Summary: There is talk of launching Operation Lotus in Maharashtra as well. Similarly, Karnataka Minister Shashikala Jolley has told reporters that the BJP government will come into existence after the end of the Corona crisis in the state.

News English Title: BJP government will come to Maharashtra as soon as the corona crisis ends said Karnataka Minister Shashikala Jolley News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x