उत्तन : अयोध्येतील विवादित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे थेट जानेवारी महिन्यात ढकलली असतानाच, आरएसएस’ने राममंदिर उभारणीबाबत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आक्रमक पवित्र घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी आता विवादित जागेचा ताबा घेणे आणि ती संबंधित ट्रस्टकडे हस्तांतरित करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने तातडीने तशी हालचाल करावी, अशी मागणी उचलून धरली केली.

उत्तन येथे सध्या आरएसएस’ची ३ दिवसांची चिंतन बैठक सुरू झाली असून, त्यात बैठकीदरम्यान राममंदिर उभारण्याबाबतच्या विषयावर आरएसएसच्या कार्यकारणीतील सदस्यांनी विचारमंथन केले त्यादरम्यान ही मागणी पुढे रेटण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्येत विवादित जागेवर राममंदिर कोणत्याही परिस्थितीत बांधले जाईल, असे स्पष्ट करतानाच, राममंदिराच्या विषयाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीला विलंब होत असल्याबद्दल संघाचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बैठकीदरम्यान प्रचंड नाराजी व्यक्त केली.

अयोध्येत श्री. राममंदिर उभारले जाण्याचा मुद्दा हा भारतासाठी अभिमानास्पद आहे. कारण हा विषय राजकीय किंवा धार्मिक नाही. तसेच, हा हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादाचा सुद्धा मुद्दा नाही. परंतु, काही लोक त्याला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देत आहेत’, असे वैद्य यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले आहे.

Central government have to acquired the land of ram janma bhumi and need transfer to concern trust