13 February 2025 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड 6150 रुपये व्याज देत राहील ही योजना, फक्त फायदाच फायदा Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या
x

मला कुठल्याही चौकात बोलवा म्हणता | शेटजी, शेतकऱ्यांच्या सिंघु बॉर्डर चौकात जा की

Congress MLA Bhai Jagtap, PM Narendra Modi, Farmers Protest, Delhi border

मुंबई, ९ डिसेंबर: मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हनन मुला (Farmers Leader Hanan Mula) यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत केंद्र सरकार आज आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर शेतकरी विचार करणार आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारसोबत होणारी बैठक होणार नसल्याचे देखील हनन मुला यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

केंद्राचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटत असले तरी पंतप्रधानांनी एकदाही आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतलेली नाही. दरम्यान, नोटबंदीच्या वेळी मला फक्त पन्नास दिवस द्या आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर कोणत्याही चौकात यायला तयार आहे आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल असं मोदींनी म्हटलं होतं. त्याचाच धागा पकडून काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

मोदींच्या नोटबंदी दरम्यानच्या त्या वाक्याचा सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडत भाई जगताप यांनी ट्विट केलं आहे कि, “”मला कुठल्याही चौकात बोलवा”, असं ते वारंवार म्हणतात. शेटजी, शेतकऱ्यांनी ‘सिंघु बॉर्डर चौका’त बोलवलंय….जा की!”

 

News English Summary: Although the Center representatives are meeting the farmers, the Prime Minister has never met the agitating farmers. Meanwhile, Modi had said that give me only fifty days at the time of denomination and after that I am ready to come in front of you in any square and I will accept the punishment you give me. Following the same thread, Congress leader Bhai Jagtap has slammed Modi.

News English Title: Congress MLA Bhai Jagtap slams PM Narendra Modi over Farmers Protest at Delhi border news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x