25 April 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

VIDEO | मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली

Delhi Chief Minister Arvind Kejriwal, tore copy, New agriculture act, Delhi assembly

नवी दिल्ली, १७ डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Delhi Border Farmers Protest ) सुरू आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. आता दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी शेतकऱ्यांना समर्थन देत कृषी कायद्यांच्या (New Farm Act) प्रति टराटरा फाडल्या. तसंच केंद्र सरकारवर निशाणा साधला.

आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत दिल्लीच्या विधानसभेत फाडली. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली. “शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी हा भगत सिंह यांच्या प्रमाणे कायद्यांविरोधात आंदोलन करतो आहे. त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही जास्त वाईटपणा करु नये” असं म्हणत या कायद्यांवरुन अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही केजरीवालांनी निशाणा साधला. “आदित्यनाथ यांनी बरेली येथील रॅलीमध्ये लोकांना कृषी कायद्याचे फायदे सांगत होते. तुमची जमीन जाणार नाही, बाजार बंद होणार नाही असं सांगत होते. पण या कायद्याने फायदा काय होणार आहे ते भाजपवाल्यांनी सांगावं. देशात कुठेही शेतकऱ्यांना माल विकता येईल हा एकच रेटा भाजपवाले लावत आहेत”, असं केजरीवाल म्हणाले.

 

News English Summary: Asked how many more victims, Chief Minister Arvind Kejriwal tore up a copy of the Agriculture Act in the Delhi Assembly. In a special session of the Delhi Legislative Assembly, Chief Minister Arvind Kejriwal sharply criticized the Agriculture Act. “So far more than 20 farmers have been martyred in the farmers’ agitation. In our country, a farmer like Bhagat Singh is agitating against the law.

News English Title: Delhi Chief Minister Arvind Kejriwal tore copy of new agriculture act in Delhi assembly news updates.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x