मुंबई : नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारताच्या विकासासंबंधी बोलताना त्यांनी देशाच्या पुर्वेकडील राज्यांमुळे देश मागास राहिल्याचे विधान केलं आहे.

भारत मानवी विकास निर्देशांकात एकूण १८८ देशांच्या यादीत १३३व्या स्थानावर आहे. परंतु देश मागास असण्याला युपी, बिहार, एमपी आणि छत्तीसगढ ही राज्य जवाबदार आहेत असं त्यांनी मत मांडलं. परंतु अमिताभ कांत यांच्या या विधानाने वाद होण्याची चिन्हं आहेत.

युपी, बिहार, एमपी, छत्तीसगढ आणि राज्यस्थान या राज्यांमुळे आपला देश सामाजिक दृष्ट्या मागास राहिला आहे. उद्योग – व्यावसायात सोपेपणा आणण्यात आपण वेगाने सुधारणा करत आहोत. परंतु मानवी विकास निर्देशांकात मात्र देश खूप मागे असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळेच मानवी विकास निर्देशांकात एकूण १८८ देशांच्या यादीत भारत १३३व्या स्थानावर आहे.

पुढे दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्य उत्तम कामगिरी करत असून त्यांचा विकास वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

eastern part of india particularly states like bihar up chattisgarh mp rajasthan is keeping india backward