2 May 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

बळीराजा संतापलाय | थेट संसदेला घेरण्याच्या इशारा | आज महत्वाची बैठक

Farmers, Delhi protest, Farm Bills, reach parliament

नवी दिल्ली, ५ डिसेंबर : केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.

शेतकरी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करत आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीत यश नक्की मिळेल. ‘मी शेतकऱ्यायांना हमी देतो की एमएसपीमध्ये कोणताही बदल होणार नाही. संघाची इच्छा असल्यास आम्ही ते लेखी देण्यास तयार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) बळकट करणे देखील आमचे प्राधान्य आहे असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत चार फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चारही वेळा चर्चा फिस्कटली. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत मोदी सरकारनं तीन कृषी कायदे केले. या कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. आधी राज्याराज्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.

News English Summary: Farmers in Punjab and Haryana have been protesting against the three agricultural laws brought by the central government for the last eight days. Today is the 9th day of this movement. Four meetings so far with Union Home Minister Amit Shah and Union Ministers have failed and farmers are still adamant about their role. Farmers are demanding repeal of the agriculture bill. So the farmers are in the mood to take concrete decisions, not just assurances.

News English Title: Farmers Delhi protest considering to reach parliament news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या