लखनऊ : उत्तर प्रदेशात मागील २४ तासांपासून पावसाचा कहर सुरु झालं झाल्याने त्यात आतापर्यंत तब्बल १६ जणांनी प्राण गमावले असून १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी शाहजहापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान झाशी जिल्ह्यामध्ये ललितपूर येथील बेतवा नदीच्या पुरामध्ये १४ मच्छीमार अडकले होते. त्यांना हवाई दलाच्या ग्वाल्हेर येथील जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वत्र जोरदार बचावसत्र सुरु झालं आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६ जिल्हे प्रभावित झाले आहेत.

सरकारने केलेल्या पाहणीत आतापर्यंत ४६१ घरांचे पावसामुळे नुकसान झाले असून त्यात १८ जनावरे ठार झाली आहेत. तसेच दिल्ली, मध्यप्रदेश आणि जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून दिल्लीमध्ये पाऊस होत आहे. उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे वृत्त एएनआय’ने दिल आहे.

Heavy rainfall in north india 16 killed