मुंबई : सत्तेत येण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना जवळ केलं खरं आणि शिवसेनेने देखील भाजपाला आपल्याशिवाय गत्यंतर नाही असं वातावरण निर्माण केल्याचे चित्र होते. २०१४च्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेची अवस्था सत्तेत असून देखील नसल्यासारखीच असल्याचे पाहायला मिळाले. मात्र सध्या सुरु असलेले निकालाचे कल पाहता भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येईल अशी अशी चिन्हं आहेत.

त्यामुळे जर तसे झाल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा बिकट होईल, कारण शिवसेने वाचून त्यांचं कोणतही राजकीय गणित अडणार नाही. परिणामी भाजपाची गुर्मी अधिक वाढून ते शिवसेनेला पुन्हा संपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतील अशी शक्यता अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवेल, कारण असं ही काँग्रेसची अवस्था राज्यात अत्यंत बिकट आहे. त्यामुळे त्याचा थेट फायदा भाजप विधानसभा निवडणुकीत उचलून उलट शिवसेनेवरच कुरघोडी करेल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

भाजप स्वबळावर सत्तेत आल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा रडकुंडीची होणार?