मुंबई : लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे समोर येत आहेत त्यातून विरोधकांची दयनीय स्थिती समोर येते आहे. त्यातून महाराष्ट्रातील काँग्रेसचा राज्यातून सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. देशातील मोठी पारंपरिक मतदार असलेला काँग्रेस पक्ष केवळ देशात नव्हे तर राज्यात देखील शेवटच्या घटका मोजत आहे अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे सध्या दिसणारी परिस्थिती आणि राज्यात पक्षाला चेहराच नसल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत कोणी युती करावी का अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी राज्यात परिस्थिती इतकी भीषण आहे की, काँग्रेससोबत आघाडी करणे सोडा तर उलट इतर लहान पक्षदेखील त्यांच्यासोबत युती करण्यास नकार देतील.
दुसरं म्हणजे राष्ट्रवादीला जर राज्यात जिवंत राहायचे असेल तर त्यांनी प्रथम काँग्रेसपासून फारकत घेणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रवादीने विधानसभे आधी नवे सहकारी पक्ष सोबत घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती पाहता राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात.
