20 April 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

पुलवामा हल्ला मोदी व इम्रान खान यांच्यामधील पूर्वनियोजित मॅच फिक्सिंग: काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद

Congress, BJP, Narendra Modi, Imram Khan

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला हा देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती. त्याला भारताने हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर देखील दिलं. परंतु, सदर प्रकरणी काँग्रेस नेत्याने एक धक्कादायक आरोप केला आहे. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पूर्वनियोजित पणे फिक्स केला होता, असा हा आरोप केला आहे.

पुलवामा हल्ल्यात भारताचे तब्बल ४४ जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचा देशभरातून निषेध नोंदवण्यात आला. इतकेच नाही तर या हल्ल्यानंतर बरोबर १३व्या दिवशी भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला प्रत्युत्तर देखील दिले. आता या हल्ल्यावरून विषय रंगताना दिसतं आहे. कारण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष प्रचारात जवानांच्या शौर्याचं श्रेय स्वतः लाटत आहेत असा आरोप विरोधक तसेच सामान्य देखील करू लागले आहेत. त्यात आता काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पुलवामा हल्ला पूर्वनियोजित म्हणजे फिक्स होता, असे सांगत खळबळ उडवून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी छुपी हातमिळवणी केली आहे. या दोघांची हातमिळवणी नसती तर हा हल्ला होऊच शकला नसता असंही हरिप्रसाद यांनी म्हटलं आहे. काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा गंभीर आरोप केला आहे.

विशेष म्हणजे दोन्ही नेते पंतप्रधान झाल्यानंतर नव्हे तर, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची तेहरीक-ए-पाकिस्तान या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासोबत नवी दिल्लीत २००३ साली एका कार्यक्रमात मैत्रीपूर्ण भेट देखील झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण सलोखा असल्याचे पाहायला मिळाले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x