नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत फारसे अंतर नाही. ती एकच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. वायनाडच्या कलपेटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली. या महारॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज वायनाडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये संविधान बचाओ सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी गांधी हत्येचा धागा पकडून नरेंद्र मोदींवर निषाणा साधला. ”महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी एकच आहे. त्यात काहीच फरक नाही. केवळ माझी नथुराम गोडसेवर श्रद्धा आहे, हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये नाही,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
नरेंद्र मोदी आणि गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे: राहुल गांधी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज वायनाडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये संविधान बचाओ सभेला संबोधित केले. pic.twitter.com/ylWpNjFt9F
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) January 30, 2020
भारतीयांना भारतीय असल्याचे सिद्ध करण्यास भाग पाडण्यात येत असून भारतीय कुणाला म्हणायचं हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण? असा सवाल राहुल गांधींनी विचारला. माझं भारतीयत्व विचारण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला? असं विचारत मी भारतीय आहे हे मला माहितेय आणि ते कुणाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही असे राहुल म्हणाले. त्याचप्रमाणे १.४ अब्ज भारतीयांना ते भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Web Title: Kerala congress MP Rahul Gandhi leads save the constitution March at Kalpeta.
