नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय राजकारणात एण्ट्री केली आहे. त्यांच्या एण्ट्रीने उत्तर प्रदेशच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होणार, याबाबत आता जोरदार चर्चाही यापूर्वीच सुरू झाली आहे. आता प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या ‘टायमिंग’वर भाष्य केलं आहे.

प्रियांका गांधी यांनी एका खासगी वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियांका म्हणाल्या की, ‘राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती.’

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारण यावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.

राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक: प्रियांका गांधी