5 May 2024 10:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मोदींचे कुटुंब असते तर तेही सहलीला गेले असते: आनंद शर्मा

Congress, Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : राजीव गांधी यांनी जे केले तेच कोणत्याही पंतप्रधानाने केले असते. पण सध्याच्या पंतप्रधानांना कुटुंबच नाही. ते असते तर तर मोदीही तिथे गेले असते. आता ते एकटेच जातात कारण त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही आणि त्यांना कुटुंबाबद्दल आदरही नाही, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कथित कौटुंबिक सहलीवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजीव गांधी यांच्या ‘त्या’ सहलीसाठी आयएनएस विराट या युद्धनौकेचा गैरवापर करण्यात आला होता, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाना तोंड फुटले होते.

त्या सहलीसाठी INS विराटचा गैरवापर झाला नव्हता असा दावा माजी नौदलप्रमुखानी केला होता तर असा गैरवापर झाला होता असा दावा आणखी एका माजी नौदल अधिकाऱ्याने केला होता. या सहलीत राजीव गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांचे काही नातेवाईक, आणि राजीव यांचे मित्र सहभागी होते, असा थेट आरोप आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x