मोदी सरकारच्या अहंकाराने ६० पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला | हट्ट सोडा

नवी दिल्ली, ५ जानेवारी: केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.
केंद्र सरकारचे औदासीन्य आणि अहंकारामुळे ६० पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी भारत सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता, केवळ विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा. असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तसेच, या ट्विटबरोबर मोदी सरकार हट्ट सोडा, हा हॅशटॅग देखील जोडण्यात आलेला आहे.
Modi Govt’s apathy & arrogance have claimed lives of over 60 farmers.
Instead of wiping their tears, GOI is busy attacking them with tear gas. Such brutality, just to promote crony capitalists’ business interests.
Repeal the anti-farm laws.#मोदी_सरकार_ज़िद_छोड़ो
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 5, 2021
दरम्यान, शेतकरी संघटना आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी बैठक पार पडली होती. दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही बैठक सुमारे चार तास चालली होती. पण ही बैठकही निष्फळ ठरली. शेतकरी संघटना तिन्ही कायदे रद्द करणे आणि एमएसपीच्या हमीवर ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने एक तिन्ही कायद्यांमधील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चेची तयारी दर्शवली आहे. आता येत्या शुक्रवारी ८ जानेवारीला दुपारी दोन वाजता पुढील बैठक होणार आहे.
News English Summary: The farmers’ agitation on the Delhi border to repeal the new agriculture laws of the central government has been going on for more than a month now. So far 60 farmers have died in this agitation. However, the agitation is still going on as no solution has been reached yet. Against this backdrop, Congress leader Rahul Gandhi has once again criticised the Modi government.
News English Title: Modi governments apathy and arrogance have claimed lives of over 60 farmers said Rahul Gandhi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Job Alert | महात्मा फुले कृषि विद्यापीठात 08 पदांची भरती
-
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार | मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
-
GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड
-
उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश
-
मुंबई काँग्रेसनंतर राज्य काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार | भविष्यातील मोर्चेबांधणी
-
नाशिकमध्ये शिवसेनेकडून लवकरच लोटसचं ऑपरेशन | दोन बडे नेते शिवबंधन बांधणार
-
VIDEO | पंतचं ढिसाळ क्षेत्ररक्षण | पुकोव्हस्कीला 2 जीवनदान
-
मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो - उपमुख्यमंत्री
-
ट्रम्प वहिनींच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करू शकतात ना? | भाजप नेत्याला प्रश्न
-
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया