जम्मू : राजौरीमध्ये पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. राजौरीमध्ये आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दरम्यान, दोन्ही बाजूंचा गोळीबार थांबला असल्याचे समजते.

प्रसार माध्यमांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरमध्ये अचानक पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून यात पाकिस्तानच्या तीन-चार चौक्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Pakistan again made firing at Indo pak border and Indian Army answered them strongly