27 April 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, ०४ जून | कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भाजपची विश्वासार्हता कशी वाढवता येईल यावर भर दिला जाणार आहे.

ही बैठक शनिवारी दिल्लीत होणार असून यामध्ये संघातील दहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रेय होसाबाळे, कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहे. हे सर्व नेते सध्या दिल्लीत पोहचले असून ते उद्याच्या बैठकीत संदर्भांत विचारमंथन करीत आहे.

या 4 प्रमुख मुद्यांवर होत आहे विचारमंथन:

  1. बंगाल निवडणुकीतील पराभव, राज्यात हिंदूवर होणारे अत्याचार आणि बंगालमध्ये सुरु असलेल्या विचार युद्धांची दिशा काय असेल?
  2. उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेली राजकीय गतिरोध कमी करणे. पंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?
  3. कोरोनाकाळात मोदी सरकारची विश्वासार्हता का कमी झाली? सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले का? केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केल्याने पक्षाला काय फायदा होईल?
  4. केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा, कित्येक राज्यांत भाजप नेत्यांना गावात प्रवेश दिला जात नाही.

 

News English Summary: The Modi government is currently on the backfoot on many issues like the Corona epidemic, farmers’ agitation and inflation. Therefore, the credibility of the Modi government is also declining. At the same time, it is facing constant criticism from the opposition. In the background, the BJP’s mother wing, the Rashtriya Swayamsevak Sangh, has taken the initiative.

News English Title: Rashtriya Swayamsevak Sangh called meeting over BJP political crisis before Uttar Pradesh Assembly Election 2022 news updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x