नवी दिल्ली, ३० जुलै : एकीकडे कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना दुसरीकडे भारताच्या म्यानमारजवळील सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार आसाम रायफलचे जवान शहीद झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात इतर चार जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात म्यानमार सीमेलगतच्या भागात दहशवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांना लक्ष्य केलं आहे. स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत.

मणिपूरमधील पीएलएच्या अतिरेक्यांनी आज सकाळच्या सुमारास हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी सर्वप्रथम आयईडीचा स्फोट घडवून आणला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नंतर आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात चार आसाम रायफल्सचे जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत.

 

News English Summary: Terrorists carried out a deadly attack on Assam Rifles personnel in Chandel district of Manipur, near the Myanmar border. Three Assam Rifles personnel were killed in the attack. The attack was carried out by terrorists from the People’s Liberation Army.

New English Title: Three Personnel From Assam Rifles Lost Their Lives In Terrorist Attack News latest Updates.

म्यानमार सीमेजवळ दहशतवादी हल्ला, आसाम रायफलचे ४ जवान शहीद, ४ जखमी