मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
नवीन आर्थिक वर्षापासून आधीच पेट्रोल – डिझेलचे दर वाढले असताना राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ‘राष्ट्रीय नागरिकांचा’ खिसा रिकामा होणार आहे.
मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलदरात दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. त्याप्रमाणेच प्रत्येक रस्त्याच्या अंतरानुसार टोलची वाढ ठरवण्यात येते. मोदीसरकारच्या या निर्णयामुळे मुंबई-नाशिक, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-आग्रा आणि मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांने प्रवास करताना प्रवाशांना सध्याच्या टोल रकमेच्या तुलनेत सहा टक्के रक्कम जास्त द्यावी लागू शकते.
मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे टोलबंदीची घोषणा याच सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केली होती. परंतु प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर मोदीसरकारने टोल वाढीचा निर्णय घेतला आहे.
