20 April 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

सत्ता आपल्या चुकीमुळे नाही तर शिवसेनेच्या गद्दारीमुळे गेली: खा. नारायण राणे

Chief Minister Uddhav Thackeray, BJP MP Narayan Rane

सावंतवाडी : स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी वेळी भारताच्या सीमावर्ती भागात आश्रय घेतलेल्या अत्याचारग्रस्त लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, हे पटवून देणारे नागरिकता विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाले. मात्र, या वेळी शिवसेनेची भूमिका ही धरसोड राहिली. हिंदुत्ववादी म्हणविणा-या शिवसेनेचा खरा मुखवटा यावेळी उघड झाला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केली. खरे म्हणजे, शिवसेना हा मुखवटा नसलेला पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

सावंतवाडी येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. नारायण राणे बोलत होते. केवळ सत्तेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. प्रशासनाची व जनतेच्या प्रश्नांची कोणतीही जाण नसलेला, अबोल मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला मिळाला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कोणतीही जाण नाही. राज्याच्या व जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत आणि विकासाला खीळ बसेल, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष अशा वेगवेगळ्या विचारधारा असणारे हे तिन्ही पक्ष असल्यामुळे त्यांचे परस्परांशी जास्त काळ पटणार नाही. तसेच काँग्रेसने जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे हे तीन पक्ष जास्त काळ एकत्र राहू शकणार नाहीत आणि हे सरकार सहा महिन्यांत कोसळेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत. राज्यातील सत्ता ही आपल्या चुकीमुळे नाही, तर मित्रपक्षांच्या गद्दारीमुळे गेली आहे. त्यामुळे भविष्यात स्वाभिमान व भाजप यांच्या एकत्रित येण्यामुळे वाढलेली ताकद एकदिलाने काम करून व पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार निष्ठा व प्रामाणिकपणे काम करून जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपचेच कार्यकर्ते जिंकतील व भविष्यात आमदार-खासदार व पालकमंत्री हे भाजपचेच असतील, असा विश्वास खासदार राणे यांनी व्यक्त केला.

 

Web Title:  BJP MP narayan Rane criticized Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x