मुंबई, १ जुलै: महाराष्ट्रात कोरोना अजूनही मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे आणि त्यात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तर मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार 2 किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी दिली आहे. चंद्रकांत पाटील यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार” असं म्हणत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?…अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे” असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तत्पूर्वी राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारचं ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू आहे. त्यामुळे ‘अनलॉक 2’ मध्ये कमालीचा गोंधळ आहे. सरकारच पूर्णपणे कन्फ्युज आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काय लॉक आणि काय अनलॉक आहे, हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं होतं.

 

News English Summary: Traffic is allowed up to 2 km as per the regulations issued by the state government. Chandrakant Patil has targeted Chief Minister Uddhav Thackeray. “Lockdown or unlock in Maharashtra? This is a confused Thackeray government,” said Chandrakant Patil.

News English Title: BJP Chandrakant Patil slams Thackeray government on lockdown in Maharashtra News latest Updates.

राज्य लॉकडाऊन की अनलॉक? पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे भ्रमित ठाकरे सरकार