27 July 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते - बच्चू कडू

Minister Bacchu Kadu, Ex CM Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

अमरावती, २० ऑक्टोबर : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पावसाने किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असे आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.

बच्चू कडू यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतल्याने, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, सरकार चालवायला दम लागतो अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जेव्हा राज्यात फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे यांचाच दम होता त्यामुळे त्यांना दम विचारण्याचा काहीच विषय नाही. उद्धव ठाकरेंचा दम त्यांना नसता तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नसते असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे तो त्यांनी दाखवून दिला आहे. कोरोना संकटासह नैसर्गिक संकटावर ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मात केली, हे दम असल्याशिवाय शक्य नाही. सत्ता गेल्यानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झालेत, त्यांनी संयम ठेवायला पाहिजे.’

 

News English Summary: Minister of State Bachchu Kadu has targeted Fadnavis. He said that when Fadnavis was in power in the state, he had the breath of Uddhav Thackeray, so there was nothing to ask him. Bachchu Kadu has also said that if he did not have the breath of Uddhav Thackeray, he would not have been the Chief Minister for five years.

News English Title: Minister Bacchu Kadu criticized Ex CM Devendra Fadnavis on his remark on CM Uddhav Thackeray News updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x