20 April 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Bharat Bandh | जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर | दुकाने बंद करण्याचं आवाहन

Bharat Bandh

जळगाव, २७ सप्टेंबर | केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात (Bharat Bandh of farmers) आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

Famers called Bharat Bandh against New Farm Laws NCP party support famers protest in Jalgaon :

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु, केंद्र सरकारने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतलेली नाही. या बाबीचा निषेध नोंदवण्यासह दिल्लीतील आंदोलनाला पाठबळ म्हणून आज काँग्रेससह देशभरातील समविचारी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. याच अनुषंगाने आज जळगावातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांनी भारत बंद पाळला जात आहे.

बाजारपेठ सुरू, नेते उतरले रस्त्यावर:
आज देशव्यापी भारत बंद आंदोलन असताना जळगावात मात्र सकाळपासूनच बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे बंद यशस्वी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील बाजारपेठेचा मुख्य भाग असलेल्या महात्मा फुले मार्केट, टॉवर चौक, गोलाणी मार्केट, नवी पेठ भागात फिरून दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, काही व्यापारी दुकाने बंद करत नसल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भारत बंद आंदोलनाची भूमिका मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणारे आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु, केंद्र सरकारला त्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे आंदोलन अधिक तीव्र व्हावे, याच अनुषंगाने आज भारत बंद पाळला जात आहे. हा बंद सर्वांनी यशस्वी करून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील यावेळी मत मांडले. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी रस्त्यावर येईल. व्यापारी आणि भांडवलदारांची मर्जी चालेल. केंद्राने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCP Congress party join the protest to support farmers Bharat Bandh in Jalgaon.

हॅशटॅग्स

#Bharat Bandh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x