मुंबई : काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले असून त्यात पुन्हा भाजपचं सत्तेत येईल असं म्हटलं आहे. त्यांनतर भाजप आणि भाजप समर्थक निवडणूक जिंकल्यासारखा जल्लोष करण्यात मग्न आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते मंडळी देखील संतापली आहेत असंच म्हणावं लागेल.
लोकसभा निवडणुकीचा रविवारी एक्झिट पोल दाखवण्यात आला. एनडीएचे बाजूने हे पोल होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधा-यांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला. विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा. दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही राज्य सरकारमध्ये नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
दुष्काळाच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार दुष्काळावर काय उपाययोजना करतंय हे तर स्पष्ट सांगतच नाही पण कोर्टात साधी हजेरीही लावत नाही. इतके गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही. एग्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा… https://t.co/WQnMJ3egJp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 20, 2019
