आ. राणाजगजीत सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ती अफवा; नेमका विषय आला समोर: सविस्तर

उस्मानाबाद : देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
नेत्यांची पक्षांतर करण्याची अनेक कारणे आहेत. काही नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अनेक नेत्यांना आपल्या शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, कारखाने यांचा वाढलेला व्याप सुरक्षित ठेवायचा आहे. त्यासाठी घेतलेले कोट्यवधीचं कर्ज कारणीभूत ठरत आहे. सत्ता नसल्यामुळे बँका घरापर्यंत येत आहेत. परंतु, सत्ताधारी पक्षासोबत असल्यास ही वेळ येणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे पक्षांतरवर नेत्यांचा भर वाढला आहे.
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरु केले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. मात्र या मुलाखतीसाठी माढा मतदारसंघाचे आ. बबन शिंदे आणि बार्शीचे आ. दिलीप सोपल हे अनुउपस्थित आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चेने जोर पकडला आहे.
पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी झाली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
मात्र त्यावर राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी पूर्ण स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की ‘पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये’ असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ‘काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रात माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे मला माझ्या कार्यकर्त्यांकडून समजले. पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही व याबाबत पक्ष कार्यकर्ते अथवा कोणत्याही नेत्यांशी माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
वास्तविक मे महिन्यातच आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी भूम, वाशी, उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत आणि पीक विमा योजने संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेत होती आणि त्यानंतर उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रु.५६.६१ कोटी चा विमा देण्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानंतर या दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी गावोगावी उत्स्फुर्तपणे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठीचे बॅनर लावले आणि त्यानंतर सर्व संभ्रम पसरवून मिळालेल्या फायद्यावरून लोकांना विचलित करण्यासाठी अफवा पसरवल्या गेल्या असं त्यांनी म्हटलं आहे.
पीकविमा प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश…
भूम, वाशी, उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत आ. @ranajagjitsinh1
यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.#पीकविमा२०१८ #Bhoom #Washi #Omarga#RanajagjitsinhaPatil #NCP pic.twitter.com/RBrgDQjxlR— NCP Osmanabad (@NcpOsmanabad) May 4, 2019
राणाजगजीत सिंह पाटील यांचं संपूर्ण स्पष्टीकरण:
“उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रु.५६.६१ कोटी चा विमा देण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानंतर या दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी बांधवांनी गावोगावी उत्स्फुर्तपणे माझे आभार व्यक्त करण्यासाठीचे बॅनर लावले. राजकारणापलीकडे याचे पूर्ण श्रेय शेतकरी मला देत असल्याने, विरोधकांचा तिळतपाट झाला असून, सामान्य जनतेचे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत. उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील पिक विम्याचा प्रश्न, रखडलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव औद्योगिक वसाहती मधील सौर ऊर्जा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या व जिल्ह्यातील इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर मी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना अनेक वेळा भेटलो आहे. या भेटींचा मुद्दामहून विपर्यास करण्यात येत आहे.
माझ्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार मी सध्या राज्याबाहेर पत्नीच्या निसर्गोपचार, उपचारासाठी आलो आहे. काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रात माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे,मला माझ्या कार्यकर्त्यांकडून समजले. पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही व याबाबत पक्ष कार्यकर्ते अथवा कोणत्याही नेत्यांशी माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवं मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा कार्यक्रम उस्मानाबाद व कळंब शहरामध्ये दि.२८ व २९ जुलै रोजी राबविण्यात येत आहे, या मध्ये देखील युवकांनी सहभागी होऊन नावे नोंदवावीत असे आवाहन करत आहे”.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER