महत्वाच्या बातम्या
-
राज्याला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, मोदी सरकारनंच पुनावालांना धमकी दिली | राष्ट्रवादीच्या या नेत्याकडून गंभीर आरोप
कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे अदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या इंधन दरवाढ, महागाईवरून शांत असलेले सदाभाऊ राज्यातील दूध दरवाढीसाठी जागे झाले? | आंदोलनाची हाक
देशात सध्या इंधन दरवाढ आणि परिणामी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईवरून देशभरातून मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त होतं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोदी सरकारवर टीका होतं आहे. देशातील आणि राज्यातील एकही भाजप नेता पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून तोंड उघडू इच्छित नाहीत. त्यामुळे राज्यातील लोकांना विचलित करण्यासाठी मराठा आंदोलन हा एकमेव मुद्दा भाजप उचलून धरत आहेत. तसेच फडणवीसांच्या सांगण्यावर राजकीय निर्णय घेणाऱ्या ठराविक भाजप नेत्यांना राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयांना हवा देण्याचे आदेश असल्याची खात्रीलायक माहिती भाजपच्या गोटातून प्राप्त झाली आहे आणि त्याप्रमाणे हालचाली सुरु झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अनलॉक सुरु झाला | मुंबईकर सुद्धा सुटले | रस्त्यावर तुफान ट्राफिक, अन गल्लोगल्ली लोकांची गर्दी
कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. आता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई अनलॉक होताच मुंबईकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात 23 मराठा संघटना काम करतात, मग भूमिका वेगळी का? | भाजप नेत्यांनी संभाजीराजेंना घेरलं
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत मराठा संघटनांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भाजप नेते समाजाला भडकवण्यात व्यस्त | तर मुख्यमंत्री उद्या पंतप्रधानांना भेटणार
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर यांची काय लायकी राहिली असती - निलेश राणे
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करण्याचा सपाटा लागल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला चंद्रकांत पाटील रोज नवनवी विधानं करून अजित पवारांना लक्ष करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी तिखट शब्दात प्रतिउत्तर दिल्यावर भाजपचे इतर नेते देखील संतापल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं सांगून फडणवीस व चंद्रकांतदादा आमदारांना थोपवत आहेत
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ | सरकार स्थापन करायला तळमळत आहेत - खडसेंची टीका
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अजब | झोपलेल्या केंद्रीय समितीकडून तब्बल २१ दिवसानंतर कोकणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज देवगड, मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली. पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे सादर करणार, अशी माहिती यावेळी समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संपलेला नाही | गर्दी, आरोग्याचे नियम मोडलेले चालणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्रात सोमवारपासून ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद मनपा क्षेत्र, जालना, नांदेड आणि लातूर शहर पहिल्या स्तरात असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मात्र मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अनिवार्य असून औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ ते ४, तर जळगाव जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
केरळ मधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका | उद्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु | नवे नियम जाणून घ्या
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. याबाबतची नवी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांपैकी ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या नियमावलीनुसार सोमवारपासून (7 जून) नेमकं काय सुरु, काय बंद असेल याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार | जयंत पाटलांचं मोठं विधान
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन - नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत - उदयनराजे भोसले
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पहिला मराठा मोर्चा 16 जूनला | छत्रपती संभाजीराजेंची रायगडावर घोषणा, ठिकाणही निश्चित
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही लोकं काही काळ आमच्यासोबतही होती, त्यामुळे त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला ठाऊक आहे - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
शिवराज्याभिषेक दिन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहित समस्त महाराष्ट्राकडून महाराजांना वंदन
दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | भाजप नगरसेवकाची महिला तलाठ्याला शिवीगाळ करत मारहाण
नंदुरबारमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! | तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता मिळवा शेतजमिनीचा असा ऑनलाईन 'डिजिटल 8-अ'
डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी हे कागदपत्र आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात,
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER