मुंबई: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली.
#VIDEO: सीएए, एनआरसीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची २४ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक#CAA #NRC pic.twitter.com/1594gnDfZC
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) January 16, 2020
या बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्या मनात आदर कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या वादात आम्हाला पडायचं नाही. राजकीय पक्षांच्या भांडणात पडून आम्हाला पॉलिटीकल स्कोर वाढवायचा नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी लोकांनी दिलेली आहे, लोकांनी हे मानलेलं आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी त्यांना मानलेलं आहे, तेच आम्हाला महत्त्वाचं आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
Web Title: Prakash Ambedkar has called Maharashtra band on 24 January against CAA.
