मुंबई : दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे, हंडाभर पाण्यासाठी गावकरी जीवाचे रान करत आहेत, अशा परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सर्वाधीक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नेटकरी एकवटले असून समाज माध्यमांवर SaveFarmersFromFadnavis ही हॅशटॅग मोहिम राबवण्यात येत आहे.
प्यायला पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम ह्या तीनही बाबतीत महाराष्ट्रात दुष्काळात काम झालं नाही #SaveFarmersFromFadnavis
— Anil Shidore (@anilshidore) May 7, 2019
सरकारच्या खोटारडेपणा मुळे पाण्यासाठी वणवण करतोय महाराष्ट्र माझा.. #SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/LX1EMsqZDi
— ShaileshBhalerao (@ShaileshBhale10) May 7, 2019
शेतकऱ्यांच्या ऊस आणि दुधावरची मलई खाऊन तयार झालेले बोके
अाता शेतकऱ्यांनाच गुरगुरतात.#SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/xay4DiizVk
— Girish Suresh Kadam (@GirishSureshKa1) May 7, 2019
“जनावरे तडफडून मरताहेत पाण्यासाठी आणि
मुख्यमंत्री तुम्ही गाताय मंगलगाणी अमृतासाठी”#SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/CRmBPypcI4— NILESH DABHERAO (@NEAL_DABHERAO) May 7, 2019
जनावरांना दुष्काळामुळे चारा नाही.दुधाला भाव नाही.लोकांना प्यायला पाणी नाही.
आणि हे मत मागण्यासाठी चाळीस लाखाच्या गाडीतून येणार!!! #SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/C4WS22ZN4m
— अनिल भोसले. (@Abhosale7) May 7, 2019
