मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात वायफळ मुद्यांना विशेष महत्व देत असून, त्याच मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी केलेला विकास शून्य कारभार आणि राजीनामा नाट्याचे प्रयोग याशिवाय दुसरं काहीच केलं नसल्याने, शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या डझनभर मंत्र्यांच्या ५ वर्षातील कारभाराचा हिशेब सामान्य जनतेला द्यावा असे आवाहन समाज माध्यमं करताना दिसत आहेत.
लोकसभेच्या आखाड्यात सध्या सर्वच पक्षांकडून प्रचारसभा आणि भाषणं सुरु झाली आहेत. परंतु २०१४ मध्ये विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सध्या सामान्य माणसाच्या दैनंदिन विषयांना बगल देत भगवं वादळ, मंदिर आणि पाकिस्तान अशा विषयावर भाषणं ठोकताना दिसत आहेत.
त्यात मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलचे भाव, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर वाढलेला दुष्काळ हे प्रमुख मुद्दे भाषणातून पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहेत. सध्या फसलेल्या विकासाची केवळ जाहिरातबाजी करून आणि थ्रीडी दाखवून लोकांना मागील २ महिन्यांपासून मूर्ख बनवण्याचं काम भाजप आणि शिवसेना करत आहेत.
