मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू, ओडिसा, पश्चिम बंगाल येथेही आज सकाळी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ९६ लाख मुंबईकर आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पुर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या १७ जागांवर हे मतदान पार पडणार आहे. यातील काही मुख्य लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
