Matrimony | लग्न करण्याचे का टाळतात नव्या पिढीच्या मुली | काय आहेत कारणं

मुंबई, ६ ऑक्टोबर : नव्या पिढीतील मुली चांगल्या मुलाच्या शोधात आणि करीयरच्या कारणाने लग्नापासून लांब पळतात. बरेचदा मनासारखा जोडीदार मुलींना सहज मिळत नसतो. आज जमाना बदलत असल्याने या बाबतीत सगळ्यांचे विचार बदलले आहेत. आता प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहली यांच्या नात्याबाबत बोलायचे झाल्यास आधी अनुष्का या बंधनात राहायला तयार नव्हती. अशातच विराटने अनकेदा प्रपोज करूनही तिने होकार दिला नव्हता. खरे तर प्रत्येक मुलीच्या मनात लग्न या विषयी काही त्रास असतात आणि त्यासाठी त्या लवकर या नात्यात पडायला तयार नसतात. चला पाहूया याबाबत मुलींचे विचार काय आहेत ते.
शिक्षण महत्वाचे:
नव्या पिढीतील मुली शिक्षणाला प्राधान्य देतात. त्यांच्या पालकांचाही त्याला आधार मिळाल्याने त्या त्यांच्या भविष्याबाबत सजग झाल्या आहेत. म्हणून त्या शिक्षणाकडे लक्ष देणे आणि त्यांची स्वप्ने साकार करणे महत्वाचे मानतात. त्या इंडिपेंडेंट होण्यावर जास्त भर देतात. आर्थिक रुपात स्वतंत्र होणे ही त्यांची प्रथम प्रायॉरिटी बनली आहे.
लग्नानंतर वाढणाऱ्या जवाबदाऱ्या:
आजही लग्नानंतर घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी सुनेवरच टाकली जाते. मान्य कि एक स्त्री ही घर सांभाळायला पूर्णपणे सक्षम असते पण सगळेच तिच्यावर ढकलून देणे हे योग्य नाही. अशात घर, मुले, माहेर, करियर, नातेवाईक यांच्याशी निगडीत सगळ्या जबाबदार्या निभावताना त्या मुलीच्या डोक्यावर त्या ओझे बनून जातात. म्हणूनच अनेकदा मुली लग्न करण्यापासून दूर पळत राहातात.
मराठी वधू-वर मोफत विवाह नोंदणी करा : Click Here to Register – https://t.co/Bp3evYjQpO pic.twitter.com/t85kVjYsYc
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 7, 2020
आईवडिलांचे बदलते विचार:
आता पूर्वीचा काळ राहिला नाही. आई वडील मुलीवर लग्नासाठी प्रेशर न देता तिचा निर्णय तिला घेऊ देतात. तिच्या लग्नासाठी घाई करण्यापेक्षा ते तिला तिच्या पायावर उभे करण्याबाबत जास्त विचार करतात. म्हणूनच मुली त्यांचे भविष्य नीट पद्धतीने घडविण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित करू शकतात.
करियरशी तडजोड करण्याची भीती:
अनेकदा लग्नानंतर घर, सासू सासरे आणि मुले यांच्या जबाबदारीमुळे मुलींना करियरशी तडजोड करावी लागते. बरेचदा अति जबाबदार्यांमुळे मुली त्यांच्या करियर आणि कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. बरेचदा यामुळे त्यांची करियरमधली ग्रोथ थांबते. अनेकदा लग्नानंतर सुनेला नोकरी सोडण्यास सांगितले जाते आणि हेच कारण आहे ज्यासाठी मुली लग्नाचा विषय टाळतात.
योग्य जोडीदाराचा शोध:
मुलांच्या तुलनेत लग्नानंतर मुलींच्या जीवनात खूप बदल होतात. मुलींना अशा जोडीदाराचा शोध असतो जो सगळ्या प्रकारे तिची साथ देईल. बरेचदा अनेक मुलगे सपोर्टिंग नसतात ज्यामुळे मग मुलींच्या करियरमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा मुलांना वाटते कि सगळ्या जबाबदार्या मुलीच्याच असतात. अशा मुलांना लहानपणी काम शिकवले नसेल तर आणखी अडचण निर्माण होते. आजच्या काळात मुलींना असा जोडीदार हवा असतो जी इंडिपेंडेंट विचारांचा असून प्रत्येक कामात बायकोची साथ देईल.
Article English Summary: The new generation of girls run away from marriage in search of a good boy and for career reasons. It is not easy for a girl to find a suitable partner. As times change, so do the views of others. Now, when it comes to the relationship between famous actress Anushka Sharma and cricketer Virat Kohli, Anushka was not ready to be in this bond before. Even though Virat proposed to her many times, she did not agree. In fact, every girl has a problem in her mind about marriage and for that she is not ready to fall into this relationship soon. Let’s see what the girls think about it.
Article English Title: Why Indian females do not want to get early marriage wedding article.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE