मुंबई : आज ५९वा महाराष्ट्र दिन, संपूर्ण महाराष्ट्रात आज विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आपण आपल्या प्रिय महाराष्ट्राचा अभिमानाने गौरव करतो.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मराठी भाषिकांचं राज्य म्हणून जरी आपण हा दिवस साजरा करत असलो तरी त्यामागे अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे याची कल्पना नव्या पिढीला करून देणे हे वरिष्ठांनी परम कर्तव्य आहे.

त्याआधी म्हणजे १९६०साला पर्यंत महाराष्ट्र व गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं. त्यानंतर मुंबईसह स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या मागणीने जोर धरला होता. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई त्या मागणीला आडकाठी घालत मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी केली. नंतर मोरारजी देसाईना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता आणि तिथेच संघर्षाची ठिणगी पेटली होती. मुंबईतील आज भरडला गेलेल्या गिरणी कामगारांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठा वाटा होता. एक दोन नव्हे तर तब्बल १०५ हुतात्म्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलं होतं.

त्यामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी आपण सर्वजण महाराष्ट्र दिन साजरा करतो. या लढ्यात श्रमिकांचा मोठा वाटा होता त्यामुळेच आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

कसा घडला महाराष्ट्र ?

59th Maharashtra Din