मुंबई: महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा ३ मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता २-३ दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची विस्तारानंतर पहिली मंत्री परिषद पार पडली. pic.twitter.com/lynUr1WBAU
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 30, 2019
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार आहेत. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी वेगळी योजना लागू करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. आधीच्या सरकारपेक्षा ५० हजारांनी ही रक्कम वाढविली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सरकार मंत्रिमंडळ! pic.twitter.com/9rhjb8q9p3
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 30, 2019
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray First Conference after Maharashtra State Cabinet Expansion.
