मुंबई: महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा ३ मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता २-३ दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार आहेत. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी वेगळी योजना लागू करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. आधीच्या सरकारपेक्षा ५० हजारांनी ही रक्कम वाढविली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray First Conference after Maharashtra State Cabinet Expansion.

२ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे