27 April 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

CAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा

Sharad Pawar, Yashwant Sinha, Gandhi Yatra, Opposed CAA NRC

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.

केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला असून सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या एकतेला तडे गेले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे समाजातील मोठ्या वर्गात नाराजी पसरली असून आता समाजातील सर्व वर्गांमध्ये एकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतातील नागरिकांना योग्य मार्ग दाखवण्याची आवश्यकता असून तो मार्ग महात्मा गांधी यांच्या विचारातून मिळेल.

भारतीय राज्यघटना धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतात यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या शांतता यात्रेसाठी शरद पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

 

Web Title:  Gandhi Yatra Begins at Gateway of India in Mumbai NCP President Sharad Pawar Showed a Green Flag.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x