20 April 2024 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

खुर्ची गेल्याची तडफड होतेय, असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटतंय? - अनिल परब

Minister Anil Parab, Sushant Singh Rajput suicide case, Amruta Fadnavis, Aaditya Thackeray

मुंबई, ४ ऑगस्ट: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. आज अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.

दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर आता राजकारण सुरू झालं आहे. या प्रकरणावर ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी मुंबई सुरक्षित नाही असं म्हणतं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. असं असताना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी मृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

‘खुर्ची गेल्याची तडफड होतेय. असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय’ असं म्हणत हातातून सत्ता गेल्यावर आता मुंबई असुरक्षित वाटत असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे. गेली ५ वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होते. पोलिसांवर विश्वास नसेल, सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी राज्य सोडून जावे. हे केवळ राजकारण करण्यासाठी होत असल्याचं अनिल परब म्हणाले.

 

News English Summary: Amrita Fadnavis says Mumbai is not safe, has cast doubt on the Mumbai police investigation. Meanwhile, now Transport Minister Anil Parab has criticized the late Fadnavis.

News English Title: Minister Anil Parab on Sushant Singh Rajput suicide case Amruta Fadnavis and Aaditya Thackeray News latest Updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x