29 March 2024 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं

Shivsena, BJP Maharashtra, uddhav thackeray, aditya thackeray, vishwanath mahadeshwar, bmc, csmt, cst

मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.

मुंबईमध्ये राहणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे त्यासाठी वेळ नसला तरी ते स्वबळावर अमरावतीला जाऊन भाजप-सेनेच्या एकत्र युती मेळाव्यात मोठं मोठी फुसकी भाषणबाजी करून आले. मुंबई महापालिकेत मलिदा मिळण्याचं साधन असलेल्या स्थायी समितीतील नियुक्त्यांच्या वेळी उद्धव ठाकरे जसे जागृत दिसतात, तसे कालच्या दुर्घटनेनंतर दिसले नाहीत. मुंबई शहरात वेगळ्याच गंभीर समस्या उद्भवलेल्या असताना उद्धव ठाकरे मात्र अमरावतीत तेच नेहमीचं हिंदू, भगवा आणि लोकांसाठी युती केल्याची फुसकी आणि कंटाळवाणी भाषणं ठोकत होते.

उद्धव ठाकरे सध्या लोकसभेच्या जागा आणि वाटण्या यामध्ये इतके बुडाले आहेत कि सध्या त्यांना काहीच दिसत नाही किंवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण सत्ताधारी शिवसेनेवर शेकू नये म्हणून आंधळे पानाचं नाटक करत आहेत, असंच म्हणावं लागेल. ५ वर्ष भाजप विरुद्ध रटाळ आणि फुसकी भाषणबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची सध्या लोकसभेच्या निमित्ताने आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबत सुरु झालेली साखर पेरणी त्यांची विश्वासाहर्ता संपुष्टात आणत आहे याच त्यांना अजिबात भान नसल्याचं सध्याचं वातावरण सांगत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x