25 April 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अपरिपक्वपणा! वर्षा बंगला सोडताना देखील भिंतीवर 'विकृत-प्रवृत्ती' दर्शन?

CM Uddhav Thackeray, Devendra Fadmavis, Amruta Fadnavis

मुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.

‘भिंतीलाही कान असतात.’ अशी एक म्हण आहे. त्यामुळं एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चार भिंतीच्या आत बोलतानाही काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील द्वेषाचं राजकारण इतकं टोकाला गेलं आहे की त्यासाठी आता थेट भिंतींचाच आधार घेतला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणावरून हेच दिसून आलंय.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला रिकामा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यात राहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. वर्षा बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या विभागाचे काही अधिकारी या बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारी वाक्य आढळून आली आहेत. या प्रकारामुळे शिवसेना-भाजप मधील शाब्दिक वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना सगळं समजतं अशी प्रतिक्रिया, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भिंतींवर अशी वाक्य कुणी आणि का लिहिली, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वर्षा बंगल्यातील व्हिडीओ कुणी शूट केला आणि तो बाहेर कसा आला याची माहिती अद्याप समोर आलेला नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. दिविजाच्या रुममधील हा व्हिडीओ आहे, असं बोललं जात आहे. व्हिडीओबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

 

Web Title:  Politics on sentences wrote on walls of Varsha Niwas Bungalow Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x