27 April 2024 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

बलात्काराच्या घटना दुप्पट, सरकारला महिलांच्या 'मन की बात' कधी कळणार ?

मुंबई : किती ही सरकार बदलली तरी स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पेक्षा बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेदछाडीच्या घटनेत तब्बल १६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मुंबई पोलिसांनीच दिली आहे.

‘प्रजा’ या एनजीओने हे माहिती अधिकारात उघड केलं आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे असेच चित्र आहे. एकट्या मुंबई शहरात २०१२-१३ मध्ये बलात्काराच्या २९३ आणि छेडछाड-विनयभंगाच्या ७९३ घटना घडल्या होत्या. परंतु ५ वर्षात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहेत. २०१६-१७ या कालखंडात मुबईसारख्या शहरात ५७६ बलात्कार तर २१०३ विनयभंगाच्या घटना घडल्याची धक्कदायक माहिती उजेडात आली आहे. बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन आहेत.

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी गेल्या ५ वर्षांमधील आकडेवारीचा विचार करता बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे समजते. मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१२-२०१३ मध्ये बलात्काराच्या एकूण २९४ घटना घडल्या होत्या, तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ७२८ पर्यंत पोहोचलं आहे. परंतु २०१६-१७ मध्ये त्यात घट होऊन ते ५७६ पर्यंत येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन म्हणजे १२ ते १६ या वयोगटातील आहेत.

एकूणच ही आकडेवारी पाहता सरकार आणि समाज हा स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधात किती उदासीन आहे हेच या आकडेवारीतून दिसत आहे. पालकांनी त्यांच्या अल्प आणि किशोरवयीन मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही हेच पालकांच्या समजण्यापलीकडे गेलं आहे.

बुलेट ट्रेन आणि पुतळ्याचं राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला ‘जिवंत स्त्रियांचं’ दुःख कळणार तरी कधी असा प्रश्न विचारला जात आहे. किंबहुना स्त्री सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने बघणारा असा नेता आहे का कुणी राज्यात असा प्रश्न अनेक स्त्रिया करत आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x