5 June 2023 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IKIO Lighting Share Price | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग IPO साठी पैसे तयार ठेवा, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय Rajasthan Congress | राजस्थान काँग्रेसच्या गहलोत सरकारच्या कामगिरीवर जनता खुश, सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारीने भाजपचं टेंशन वाढणार Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार?
x

१४ तारखेनंतर ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Lockdown, Corona Crisis

मुंबई १४ एप्रिल: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांचं लॉकडाऊन आज संपलं. आता 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनेच आपण नक्की जिंकणार आहोत हा आत्मविश्वास मला आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे.

आम्हाला गावी जायचे आहे, अशी मागणी करत वांद्रे स्टेशनवर आज शेकडो मजुरांनी धडक दिली व तिथे ठिय्या दिला. लॉकडाऊनविरुद्ध झालेल्या या उठावावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. ‘क्यों परेशान हो रहे है? असा सवाल करत त्यांनी हिंदीतून संवाद साधत परराज्यातील मजुरांना विश्वास दिला. १४ तारखेला लॉकडाऊन संपेल आणि ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं आणि त्यातून हा सारा प्रकार घडला असावा असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या सर्वच मजुरांना विनंती केली. तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

त्याचसोबत संपूर्ण देशात जितक्या चाचण्या झाल्या नाहीत तेवढ्या राज्यात होत आहे, महाराष्ट्र सरकार खंबीरपणे कोरोनाशी मुकाबला करतंय. कोरोनाची लागण झाली म्हणजे संपलं असं नाही. योद्धा तनिष्क मोरे सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी माझं बोलणं झालं. कोरोनावर मात करु शकतं त्यानंतर ८३ वर्षाच्या आजीला फोन केला त्यांनीही कोरोनावर मात करुन दाखवली आहे. ही लढाई अधिक प्रखरतेने लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फॉर्स तयार करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील डॉक्टर्स तज्ज्ञांची टीम बनवली आहे. या आजारातून लोकांना कसं बरं करु शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांची पहिली बैठक माझ्यासोबत झाली आहे अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

News English Summary: The 21-day lockdown ended today to prevent Corona spread. Prime Minister Narendra Modi had announced that the lockdown would be extended till May 3. The Chief Minister had announced two days ago that the lockdown in the state would be extended till April 30. Against that backdrop, he interacted with the public again today.

News English Title: Story Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Facebook live on over corona crisis lockdown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x