28 April 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

१९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मलाच आठवत नाही: शरद पवार

NCP President Sharad Pawar

मुंबई: ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टीकणार आहे त्यात काहीही अडचण येणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन २०२० या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे विचार मांडले आहेत.

सरकार चालवताना काही गोष्टी शिकायच्या असतात बाहेर उघड करायच्या नसतात, शिवसेना म्हणून आमचा कधीही संपर्क आला नाही, बाळासाहेबांशी मित्र म्हणून संबंध आला, बाळासाहेबांमध्ये एक सभ्यता होती, आम्ही दोघे जाहीर सभेतून एकमेकांबद्दल बोलायचो मात्र जाहीर सभानंतर आम्ही एकत्र आलो की सुसंवाद चालायचा. बाळासाहेबांनी भाषणात बोलले शब्द कधीही मागे घेतले नाहीत, बाळासाहेबांचा निर्णय ठाम असायचा असं शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचं नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते, त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे असे पवारांनी म्हटले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, की हे तीन पक्षांचे सरकार आहे. १९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मला आठवत नाही. शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने कारभार करत आहेत, त्याला किती मार्क द्याल? असे विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ अजून आलेली नाही, पण त्यांचा मार्ग योग्य आहे. इतरांना काम करण्यासाठी संधी देत आहेत. प्रोत्साहनही देत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

 

Web Title: Story NCP President Sharad Pawar said I do not remember about alliance parties which I was handled in 1978.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x