2 May 2025 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

ठाकरे सरकारची १०० कोटींची मदत अत्यंत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस

Raigad, 100 Crore Relief Fund, Fund inadequate, Devendra Fadnavis

मुंबई, ६ जून: राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा कोकणात – नाशिकमध्येही नुकसान झालं होतो. तेव्हा आम्ही विशेष जीआर काढून एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत देण्याचे निर्णय घेतले होते. सांगली – कोल्हापूरसाठी आपण ४७०८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं होतं. कोकण नाशिक करता २१०५ कोटी रुपयांचे पॅकेज दिलं होतं. आताच्या सरकारनेही अशीच मदत जाहीर करणे आवश्यक आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक केले. “मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम ३७० रद्द करणे हा महत्वाचा निर्णय होता” असे ते म्हणाले. “३७० रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे बोलले जायचे. पण असे काही घडले नाही उलट काश्मीरच्या विकासाची प्रकिया सुरु झाली” असे त्यांनी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायदा, राम मंदिर हे केंद्र सरकारचे चांगले निर्णय असल्याचे ते म्हणाले.

 

News English Summary: The state government’s Rs 100 crore assistance to Raigad, the worst hit by the cyclone, is inadequate. Opposition leader Devendra Fadnavis today demanded that 75 per cent of the aid should be declared to the victims.

News English Title: The state governments 100 crore assistance to Raigad the worst hit by the cyclone is inadequate News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या