मुंबई : राज्यभर सध्या थंडीची हुडहुडी भरली असता अजून एक वृत्त आले आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणार्‍या अतिथंड वार्‍यांच्या प्रवाहांमध्ये मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्राच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच थंडीच्या लाटेची तीव्रता अजून वाढल्याचे जाणवत आहे, तर पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने वृत्त दिले आहे.

चंद्रपूरमध्ये सध्या ८.२ डिग्री सेल्सियस, औरंगाबादेत ८ डिग्री सेल्सियस तर जळगावात ६.४ डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हा पारा पुढील दोन दिवसांत अजून खाली जाणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर थंडीचा सामना करावा लागणार आहे.

winner effect will increase more within 2 days