नागपूर: लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे याच लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद असताना सुद्धा पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे आणि त्याच मूळ कारण म्हणजे त्यांनी केलेली विकास कामं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याने काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.
