19 April 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अमित शहा पाकच्या पाण्यात झोपले की पाकिस्तानचं पाणी बंद होणार का? राज ठाकरेंचा टोला

Ajit Doval, Raj Thackeray

कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या काळात अगदी नोटबंदीपासून ते पुलवामा हल्ल्यापासून सर्वच गंभीर विषयांमधील वास्तव उघड करायचं असेल तर आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सखोल चौकशी करा, म्हणजे सगळंच सत्य समोर येईल असं खबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. निवडणुका जवळ येतील तशा मोठ्या घटना घडवल्या जातील आणि तुमचं लक्ष त्याकडे वळवलं जाईल. नोटाबंदी, राफेल प्रकरण जनता विसरावी यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे जनतेनं जागं राहावं, असंही त्यांनी नमूद केलं. अनेक विरोधकांनी यापूर्वी अजित डोभाल यांच्या मुलाची पाकिस्तानी कंपनीत गुंतवणूक आणि पार्टनरशिप असल्याचा आरोप केला होता.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद हे राजकीय बळी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा खळबळजनक दावा त्यांनी कोल्हापुरातील सभेत केला.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x