30 April 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

निवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार ?

नवी दिल्ली : देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.

भारतात पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाण्याची चिन्हं दिसत आहेत. २०१४ पासूनचा निकालानंतर आणि विविध पक्षांच्या आरोपानंतर भाजपने यावर गांभीर्याने विचार सुरु केला आहे. परंतु सर्वच पक्षांचं एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशिन हद्दपार करण्याची तयारी असल्याचे भाजपच्या गोटातून समजत आहे.

ईव्हीएम मशीन संबंधित विविध आरोपानंतर काँग्रेसने भविष्यातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु आता विविध आरोपानंतर भाजपने सुद्धा यांच्या भूमिकेत बदल केला आहे. ए.एन.आयशी बोलताना भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी प्रतिक्रिया दिली की जर विविध पक्षांना वाटत असेल तर आम्हाला परत मतपत्रिकेकडे वळण्यास काहीच अडचण किंव्हा हरकत नाही, केवळ सर्व बाजूंचा विचार करून चर्चा होण्याची गरज आहे. कारण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनकडे वळवण्याचा निर्णय हा सर्वसहमतीने त्यावेळी घेण्यात आला होता, हे फक्त काँग्रेसने विसरू नये असं स्पष्टीकरण सुद्धा भाजपच्या राम माधव यांनी ए.एन.आयशी बोलताना दिल.

२०१४ नंतरच्या विविध निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून निवडणुका जिंकल्या जात आहेत असे आरोप विविध पक्षांकडून केले गेले. त्या आरोपांनी जास्त जोर धरला तो उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या यशाने. त्यानंतर काँग्रेस आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे हरकती दर्शविल्या होत्या. सध्या नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाचं अधिवेशन सुरु आहे आणि तिथे तशा आशयाचा ठराव सुद्धा काँग्रेसने मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा भारतातील निवडणूक प्रक्रिया मतपत्रीकेकडे वळवण्याचा विषयाने जोर धरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EVM Machine(4)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या