नवी दिल्ली : काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

आजच्या बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. बंद शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसाने होऊ न देता आंदोलन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी बंदमध्ये अनेक ठिकाणी दुकानं, बाजारपेठा, कार्यालयं बंद राहणार आहेत. जीवनाश्यक वस्तुंना या बंद मधून वगळण्यात आलं आहे.

Bharat band today will participate by thirty one parties all over the nation