लखनौ : भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री तसेच मित्रपक्ष सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे.

ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका करताना आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी देशभरात दंगली घडवू शकतं आणि २१ फेब्रुवारीला राम मंदिराच्या नावे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्ष सध्या देशात निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवण्याच्या मूडमध्ये आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे लोक मतं मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात’. दरम्यान, राजभर यांनी भाषणावेळी उपस्थित हिंदू आणि मुस्लिमांना एकजूट राखण्याचं जाहीर आवाहन सुद्धा केलं आहे.

याआधी राजभर यांनी कोणत्याही जातीय दंगलीत केवळ सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? त्यात राजकीय नेते का नसतात? तसेच ‘हिंदू मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का? असा प्रश्न विचारला होता. केवळ धर्माच्या आधारे भांडणं लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना आधी जिवंत जाळलं पाहिजे. यानंतरच त्यांना गांभीर्य कळेल आणि इतरांना ‘जाळणं’ बंद करतील’, असं ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर एजन्सी सीआयए’ने सुद्धा त्यांच्या अहवालात याचा उल्लेख करत, भाजपचा हिंदू कट्टरवाद भारतात निवडणुकीआधी मोठी जातीय दंगल घडवू शकत असं म्हटलं होत.

bjp have plan to riots in india before 2019 lok sabha election alleges up minister rajbhar