नवी दिल्ली : भाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी ही विक्षिप्त प्रतिकिया दिली आहे. सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत असं ही ते बरगळले.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे जम्मू काश्मीरच्या पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रतिकिया देतात की ‘आपल्या जवानांच बलिदान व्यर्थ जाणार नाही’. तर दुसरीकडे त्यांचेच भाजप सरकारमधील खासदार आपल्याच बहाद्दूर जवानांबद्दल असे विक्षिप्त विधान करतात. त्यांच्या या विधानामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.
