नवी दिल्ली : भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी भाजप सरकारवर सीबीआयमधील घटनांवरून गंभीर आरोप केले आहेत. माझं भाजप सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असून, CBI नंतर पुढची कारवाई ईडी’च्या अधिकाऱ्यांवर होईल, असं भाजप खासदार स्वामी यांनी मत व्यक्त केल्याने भाजप तोंडघशी पडली आहे.

CBIचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यामधील वाद टोकाला गेल्यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला. या दोन्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले आणि CBI कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या. परंतु, मोदी सरकारच्या या कारवाईवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान CBI नंतर पुढचा क्रमांक ईडी’चा असेल, असं भाकीत सुद्धा स्वामींनी वर्तविल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सीबीआयनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई सुरु झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असं सुब्रमण्यम स्वामींनी मत व्यक्त केलं आहे.

bjp mp subramanian swamy claims that bjp government helping corrupt peoples